प्रतिनिधी : सुरेश शिंदे
टाकळघाट वर्धा : महाराष्ट्र मध्ये अनेक साधुसंत होऊन गेले परंतु आई-बाबांचे इच्छा खातीर स्वतःला लोखंडी बेडी मध्ये जखडून घेऊन आयुष्यभर अनेक गोरगरिबांना चमत्कार दाखवून त्यांचे दुःख दूर करणारे टाकळघाट येथील विक्तु बाबा.
15 एप्रिल 1918 या दिवशी विक्तू बाबा चा जन्म झाला परंतु जन्मल्यानंतर लहान बाळ लगेच रडत असते परंतु सात दिवसानंतर आईचे दूध न पिता व न रडता हे बाळ असे जिवंत होते आई बापाला नक्की समजत नव्हती की नक्की काय चमत्कार आहे परंतु सात दिवसानंतर पहिल्यांदा रडले त्यानंतर सुरू झाला एका आगळ्यावेगळ्या विक्तू बाबाचा जीवन प्रवास
जसे त्यांचे वय मोठे होत होते तस तसे त्यांचे कडून लहान मुलं करत असणाऱ्या खोड्या चालू होत होत्या परंतु अल्लड बालपण असावे असे समजून त्याचे आई-वडिलांनी याकडे दुर्लक्ष केले परंतु ज्या दिवशी शाळेचा पहिला दिवस होता त्याच दिवशी आपल्या गुरुजींच्या डोक्यामध्ये आणलेली पाटी फोडून त्यांनी तिथून पलायन केले मुलगा नक्की कोणत्या मार्गाला लागला आहे हेच त्याच्या आईबापांना समजत नव्हते त्यानंतर अनेक दिवस जंगलात राहून त्यांनी कंदमुळे खाऊन आपली जीवन व्यथीत केले .
त्यानंतर पुन्हा एकदा घरच्यांच्या सांगण्यावरून त्याला घरी आणण्यात आले मात्र अजूनही त्यांची खोडी काही गेली नव्हती त्यानंतर मात्र याच्याकडून काही अघटीत घडेल या भीतीने त्याच्या वडिलांनी लोहाराकडून जाड लोखंडी बेडी त्याच्या हाता पायात बांधली मात्र आई-वडिलांचे अशी इच्छा असेल तर ही बेडी मी आयुष्यभर काढणार नाही असा त्यांनी प्रण केला व एकाच जागी बसून त्यांनी हाताला व पायाला बेड्या घालून आपल्या आयुष्य कंठू लागले नक्की काय प्रकार आहे असे पाहून अनेक गावातील लोक त्यांच्याकडे भेटण्यास येऊ लागले बोलता बोलता त्यांच्या तोंडून येणाऱ्या शिव्या मार्फत अनेक लोकांचे कल्याण होऊ लागल्याने तिथेच त्यांना एक मठ बांधून देण्यात आला आणि आज त्याच ठिकाणी टोले जंग असे भवन त्यांनी जिथे उभारलेले आहे दर पौर्णिमा ला लाखो भाविक त्या ठिकाणी येऊन त्यांचे दर्शन घेऊन आपल्या मनातील दुःख त्यांना सांगतात व आपले भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी आजही त्यांचा आशीर्वाद अनेक भक्तांच्या मागे आहे असे देखील तेथील भाविक सांगत असतात.
मंदिर परिसरातील समोरील बाजूला येणाऱ्या भाविकांसाठी जेवणासाठी मोठा हॉल देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच मंदिर परिसरात एका बाजूला साधारण 15 वर्षांपूर्वी आणलेली भगवान गौतम बुद्ध यांची साधारण आठ ते नऊ फूट उंचीची पूर्ण पंचधातूची मूर्ती अनेकांना मानसिक शांतता प्रदान करत आहे.
16 एप्रिल 1987 रोजी देह ठेवला मात्र आहे त्या ठिकाणी च त्यांची समाधी करून आजही अनेक भक्तांना नागाच्या स्वरूपात ते दर्शन देऊन त्यांचे दुःख दूर करत असतात अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.